Saturday, 31 October 2015

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला.......

हरवलेली पाखरे येतील का

पुन्हा भेटायला.......


गेलेले दिवस येतील का

पुन्हा सजवायला.......


एकत्र राहून खूप हसलो,

खेळलो.......


शेवटच्या दिवशी मात्र

रडलो...


पाहिलं आपण एकमेकांच्या

डोळ्यात सजवलेलं

गाव.....


कधीच विसरु नका आपल्या

मित्र मैत्रिणीचं नाव......


जगाच्या कान्याकोपर्यात

कुठेही जाऊ........


एकमेकांना काही सेकंदासाठी

आठवुन पाहु........


खरच हरवलेली पाखरे येतील

का पुन्हा भेटायला......


आठवणींतील ते दिवस

पुन्हा सजवायला.......


आयुष्यात खूप काँप्रमाइज़

केलं.....


फक्त एकाच ठिकाणी

मानासारख जगायला मिळालं,

हसायला मिळालं.......


ते म्हणजे आपले मित्र आणि

*आपला ग्रूप*......


आयुष्यात जर मित्रच भेटले

नसते......


तर कधीच  विश्वास बसला

नसता..... की अनोळखी

माणसं सुध्दा,.रक्ताच्या

नात्यापेक्षा खुप जवळची

असतात...!!!



मैत्री ची सुंदर व्याख्या



" उद्या मी ह्या जगात नसेल ,

        पण तरीही

  माझा नंबर तुझ्या मोबाइल मधे   

        नक्की असेल । "

आसमंत हा उजळून जाई

आसमंत हा उजळून जाई

चंद्र प्रकाशात पृथ्वी न्हाई

कोजागिरीच्या पौर्णिमेची

रात हि आनंदात रंगून जाई ...........

चंद्र चांदणे आकाश सजवी

पृथ्वी सगळी उजेडात हि थिजली

मना-मनामध्ये आनंदाचे

रंग तरंग हे भरून जाई ........

बदाम- पिस्ता, केशर मलई

दुध सुगंधी बनवून जाई

आई लक्ष्मी च्या आशीर्वादाने

चंद्र तारका हरकून जाई .........

चंद्राची ती मंगल पूजा

लक्ष्मी मातेच्या कृपा प्रसादे

लहान मोठे सुखात न्हाई ,

कोजागिरीच्या पौर्णिमेची

रात हि आनंदात रंगून जाई ..