Monday, 2 March 2015

( एकदा वाचाच.....स्वतःहून शेअर कराल )


.
खुप वाईट वाटलं जेव्हा मी एक प्रसंग पाहिला..खरचं लोकांची मानसिकता कुठे चालली आहे.
.
.
आज आमच्या जवळच्या साईंच्या देवळात गेलो होतो... दर्शन घेऊन बाहेर आलो न् समोरच्या ठेल्यावर उसाचा रस घेत होतो, तिथेच बाजूला हाराच् दुकान पण आहे...
एक चांगला पस्तिशीचा इसम तिथे आला, त्याने अगदी 250 रु. चा सुन्दर हार घेतला... तेवढ्यात त्याच्या कड़े एक गरीब मुलगा आला, याच त्या मुलाकडे लक्ष नव्हतं.. तशी काही गरज पण नव्हती... 11 वर्षाचा असेल तो मुलगा...
त्याने त्या इसमाच्या हाताला स्पर्श केला तो त्याने त्याच्या कड़े पाहिले आणि
अगदी दूर ढकलत, स्वतःचा हात रुमालाने पुसला...
पण तो मुलगा अगदी रडवा चेहरा करुन्त्या च्या कड़े पाहत होता, त्याचे डोळे
पानावलेले होते आणि तो पैसे मागत नव्हता तर 1 ग्लास उसाचा रस त्याच्याकडे मागत होता...तहान लागली आहे बोलत होता, पण त्या इसमाला काही पाझर फुटला नाही.
ते पाहुन, मी रस वाल्याला सांगितले, त्या मुलाला रस दे, पैसे मी देतो..
तो मुलगा रस प्यायला आणि माझ्या कड़े क्षणभरचं पाहिलं..
एक स्मित हास्य आणि पळाला...
तहान भागल्याच् सुखं त्याच्या कोवळ्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवलं...
तोवर या इसमाचा इगो दुखावला होता...
तो मला बोलला, "आप जैसे लोग इन भिकारियों को सर चढ़ाते हो..."
मी त्याला बोट दाखवलं... तो मुलगा पुढे जाऊन मंदिराचे जीने पुसतं होता...
एवढच बोललो...
"आपको साईं के मूर्ती में भगवान् दिखता है, जिसके लिये आपने 250 का हार लिया.. और मुझे उस बच्चेके हँसी में साईं मिल गए..
आपका भगवान् 250 में भी नहीं हँसा,
लेकिन मेरा साईं 10 रूपयों में भी हँस दिया..."
.
.
माहित नाही मित्रांनो.. पण हे लिहिताना देखिल माझे डोळे पाणावले...
कुठे आहे माणुसकी...? कुठे चालली आहे भक्ति..?


No comments:

Post a Comment